भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना आता आर्थिक आणि औद्योगिक गुंतवणुकीच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर…
महाराष्ट्राची औद्योगिक गुंतवणूक – ऑगस्ट १९९१ ते ऑक्टोबर २०१४ या कालावधीत एकूण १०,६३,३४२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या १८,७०९ औद्योगिक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यापैकी २,५४,७८४ कोटी गुंतवणुकीचे व प्रस्तावित १०.९५ लाख रोजगार निर्मितीचे ८,३७६ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.
महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक – ऑगस्ट १९९१ ते मार्च २०१२ या कालावधीत राज्यात थेट गुंतवणुकीच्या माध्यमातून ४,२४६ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यातील गुंतवणूक ९७,७९९ कोटी रुपयांची आहे. राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात विदेशी गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका आणि मॉरिशस या दोन प्रमुख देशांचा समावेश असून त्यांचा अनुक्रमे १४ आणि १३ टक्के वाटा आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्यात एकूण ३८,९३३ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली. पण २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यामुळे नोव्हेंबर २०१४ ते मार्च २०१५ या ५ महिन्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात साधारण ५ ते सहा हजार कोटींची परकीय गुंतवणूक झाली.
महाराष्ट्रातून निर्यात – राज्यातून मुख्यत्वे रत्ने व आभूषणे, सॉफ्टवेअर, कापड, तयार कपडे, सुती धागे, धातू आणि धातुची उत्पादने, शेतीवर आधारित उत्पादने, औषधे व औषधी द्रव्ये, प्लॅस्टिक व प्लॅस्टिकच्या वस्तू आदींची निर्यात होते. २०१३-१४ मध्ये महाराष्ट्रातून ४,३४,५९१ कोटी रुपयांची निर्यात झाली.



















