महाराष्ट्र सरकारने भारतीय ट्राम वे कायदा, १८८६ अंतर्गत नवी मुंबई सार्वजनिक जलद वाहतूक यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी सिडकोची नेमणूक केली. तसेच नवी मुंबईचा मुंबईशी संपर्क वाढविण्यासाठी मेट्रो मार्गिकेचा विचार केला. यासाठी दिल्ली मेट्रो रेल महामंडळाला (डीएमआरसी) मेट्रोच्या तांत्रिक सल्लागारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
नवी मुंबई मेट्रोचा उदय आणि 'इन्फ्रा मॅन' देवेंद्र फडणवीस यांचे गतिमान योगदान
नवी मुंबई मेट्रो प्रकल्प हा या शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरा बदलणारा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. २०१० मध्ये या प्रकल्पाची अधिकृत सुरुवात झाली असली, तरी सुरुवातीच्या काळात भूसंपादन, तांत्रिक परवानगी आणि कंत्राटदारांचे अंतर्गत वाद यामुळे हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर रखडला होता. मात्र, ऑक्टोबर २०१४ मध्ये महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी राज्यातील प्रलंबित इन्फ्रा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘वॉटरशेड’ निर्णय घेतले, म्हणूनच त्यांना ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून ही ओळखले जाते. देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील प्रशासकीय अडचणी दूर करून आणि उच्चस्तरीय बैठकांच्या माध्यमातून विविध तांत्रिक मंजुऱ्यांचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या याच दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मरगळ आलेल्या या प्रकल्पाला कमालीची गती मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात या प्रकल्पाचे काम खूपच रखडले. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च १,९८४ कोटी रुपयांवरून थेट ३,०६३ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला. नवी मुंबई मेट्रो मार्ग १ सीबीडी बेलापूर ते पेंढार दरम्यानचा ११.१ किलोमीटरचा उन्नत मार्ग पूर्ण झाला आहे. या मार्गावर ११ स्टेशन्स बांधण्यात आली आहेत. आज हा मार्ग नवी मुंबईतील मेट्रो नेटवर्कचा पाया ठरला आहे. यापुढील टप्प्यांमध्ये नवी मेट्रोचा विस्तार होऊन हा मार्ग तळोजा आणि कळंबोलीमार्गे थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे.
मेट्रो रेल्वे अधिनियमांतर्गत अधिकृत घोषणा
भारत सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प, मार्गिका-१, मार्ग क्र. १ (बेलापूर ते पेंढार) याच्या नकाशाची समन्वय घोषणा. दि मेट्रो रेल्वे (कामांचे बांधकाम) अधिनियम, १९७८ च्या कलम ३२ अंतर्गत उपरोक्त प्रकल्प मेट्रो अधिनियमांतर्गत विकसित करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले. ऑक्टोबर २०१४ नंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. या काळात त्यांनी राज्यातील इन्फ्रा प्रकल्पांना कमालीचा वेग दिला.
बेलापूर ते पेंढार (लाईन-१) मार्ग प्रवाशांसाठी खुला
बेलापूर ते पेंढार हा पहिल्या टप्प्यातील ११ किलोमीटरचा मेट्रो मार्ग (११ स्टेशन्स) प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. कोणत्याही मोठ्या औपचारिक उद्घाटन सोहळ्याची वाट न पाहता, महायुती सरकारने १६ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ही सेवा १७ नोव्हेंबरपासून, कोणत्याही उद्घाटनाविना सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात झाली.
नवी मुंबई मेट्रो मार्गिका २ आणि १-अ च्या ५५७५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता
नवी मुंबई मेट्रो मार्गिका- २अ (बेलापूर ते सागर संगम, ३.०२ किमी) आणि नवी मुंबई मेट्रो मार्गिका – २ (पेंढार ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, १४.०७ किमी) या एकूण लांबी १७.०९ किमी, १२ उन्नत स्थानके (नवी मुंबई मेट्रो मार्गिका – १ अ चे १ स्थानक + नवी मुंबई मेट्रो मार्गिका – २ ची ११ स्थानके) असलेल्या एकूण ५,५७५.00 कोटी प्रकल्प पूर्णत्व किमतीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांची मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) मार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सदर प्रकल्पासाठी केंद्र सरकारमार्फत निधी प्राप्त करून घेण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) यांना प्राधिकृत करण्यात आले. या प्रकल्पाला महत्त्वपूर्ण सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण शहरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. तर या प्रकल्पासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली.
अडथळ्यांवर मात करत नवी मुंबई मेट्रोचा यशस्वी प्रवास
अनेक तांत्रिक, वित्तीय आणि प्रशासकीय आव्हानांचा सामना करत अखेर १७ नोव्हेंबर २०२३ रोजी नवी मुंबई मेट्रोची बेलापूर ते पेंढार (लाईन-१) ही पहिली मेट्रोलाईन सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत दाखल झाली. कोणत्याही औपचारिक उद्घाटन सोहळ्याची वाट न पाहता महायुती सरकारने ही सेवा थेट जनतेसाठी खुली करून एक नवा आदर्श घालून दिला. हा प्रकल्प आता फक्त लाईन-१ पुरताच मर्यादित राहिलेला नाही. तर २२ जून २०२६ रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या नेटवर्कचा आणखी विस्तार होणार आहे. मार्गिका-२ आणि १-अ च्या मंजुरीमुळे आता ही मेट्रो थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सागर संगम परिसराला जोडली जाणार आहे. सुरुवातीच्या विलंबाकडून गतीमान झालेला नवी मुंबई मेट्रोचा प्रवास उल्लेखनीय आहे.
