महाराष्ट्राच्या विकासाची कनेक्टिव्हीटी ‘समृद्धी महामार्ग’!
महाराष्ट्राच्या विकासाची कनेक्टिव्हीटी ‘समृद्धी महामार्ग’!
नागपूर, विदर्भ आणि मराठवाडा सारख्या मागासलेल्या भागांचा विकास साधण्याच्या दृष्टिने मुंबई आणि नागपूर यांना थेट जोडणारा रस्ता असावा, अशी कल्पना देवेंद्रजींच्या डोक्यात २० वर्षांपासून रेंगाळत होती. २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये नागपूर-मुंबई या सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे ची घोषणा केली होती. ती घोषणा आता १० वर्षांनी पूर्णत्वास आली आहे. नागपूर ते मुंबई असा ७०१ किमीचा हा महामार्ग पूर्ण झाला आहे. ५ जून २०२५ रोजी त्याच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण इन्फ्रामॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले असून, हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या महामार्गाचे भूमिपूजन आणि पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा महामार्ग हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जातो. या महामार्गासाठी देवेंद्रजींनी (Infra Man Devendra Fadnavis) विक्रमी वेळेत भूसंपादन केले होते. शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक नुकसानभरपाई दिली होती. हा रस्ता फक्त आता एक महामार्ग न राहता तो समृद्धी कॉरिडॉर म्हणून विकसित होत आहे.
२०१५
३१
जुलै २०१५
नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे ची घोषणा
देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर वर्षभराच्या आत ३१ जुलै २०१५ रोजी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सर्वप्रथम नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे प्रमाणेच नागपूर-मुंबई असा एक महामार्ग व्हावा, अशी कल्पना देवेंद्रजींच्या मनात २० वर्षांपासून होती. ती त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१५ मध्ये प्रथमच अधिकृतरीत्या विधानसभेत घोषित केली.
मुंबई-नागपूर एक्सप्रेस-वे साठी एमएसआरडीसीची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून निवड
मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या ३० नोव्हेंबर २०१५ च्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस- वे च्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून घोषणा करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम एमएसआरडीसीच्या देखरेखीखाली होणार आहे.
Read More
२०१६
५
जुलै २०१६
पूलिंग मॉडेल अंतर्गत जमीन संपादन
नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गाची निर्मिती आणि त्याच्याशी संबंधित कामासाठी लॅण्ड पुलिंग योजनेद्वारे जमीन मिळवणे, तसेच विकसित जमिनीच्या स्वरूपात मोबदला देणे आदी बाबींना मान्यता देण्यात आली. यापूर्वी शासकीय प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया अवलंबवली जात होती. या प्रक्रियेत सरकार जमिनीचा एकरकमी मोबदला देऊन प्रक्रिया पूर्ण करत होती. पण यामुळे काही वेळेस शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रथमच समृद्ध महामार्गासाठी भूसंपादनऐवजी भूसंचयन (लॅण्ड पुलिंग) ही नवी पद्धत वापरली गेली.
नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे बांधणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ जुलै २०१५ रोजी विधानसभेत नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस – वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. या प्रकल्पांतर्गत ११ जिल्हे आणि जवळपास २० महत्त्वाची शहरे द्रुतगती मार्गाने राज्याच्या राजधानीशी जोडली जाणार आहेत. यामुळे या महामार्गाच्या आसपास शैक्षणिक, पर्यटन आणि वैद्यकीय सेवा सुंकुले तयार करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे बांधण्याचा निर्णय घेतला.
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी सरकारने जमीन संपादित करण्यासाठी मोजणीचे काम सुरू केल्यानंतर विदर्भ, औरंगाबाद, नाशिक येथील शेतकऱ्यांनी विरोध केला. सहमतीशिवाय जमीनीची मोजणी होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी विरोधात निदर्शने केली. यावर मुख्यमंत्री, मंत्री आणि स्थानिक आमदारांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यावर मार्ग काढण्यात आला.
Read More
१५
जुलै २०१७
रेडी रेकनर रेटचा वापर करून जमिनीचे दर ठरवले
समृद्धी महामार्गासाठी जमीन एकत्रीकरण, भूसंपादन आणि थेट खरेदी योजनेच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया राबवली. यासाठी रेडी रेकनर रेटचा वापर करून जमीनीचे दर ठरवण्यात आले. जमीनीच्या दरात झाडे, घरे, विहिरी आणि शेतातील इतर मालमत्तांचाही समावेश करण्यात आला. काही ठिकाणी जमीन मालकाला रेडी रेकनर रेटप्रमाणे ठरविलेल्या किमतीच्या दुप्पट किंवा १०० टक्के नुकसान भरपाई देऊन तर काही ठिकाणी जागेच्या मूळ किमतीच्या ५ पट अधिक रक्कम देण्यात आली. यामध्ये सरकार शेतकऱ्याची जेवढी जमीन घेणार आहे. त्या जमिनीच्या पाचपट विकसित जमीन (एन.ए. जमीन) त्याच परिसरात मालकी हक्काने दिली गेली.
Read More
२०१८
२६
एप्रिल २०१८
भूसंपादन कायद्यामध्ये दुरुस्ती
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीनींचे अधिग्रहण करण्यासाठी सरकारच्यावतीने २६ एप्रिल, २०१८ रोजी भूसंपादन कायदा २०१३ मध्ये दुरुस्ती करून, जमीन अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
Read More
३१
मे २०१८
समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कंत्राटदारांची निवड
नागपूर-मुंबई महामार्गाच्या उभारणीसाठी सरकारने १६ पॅकेजेस तयार केली होती. त्यातील १३ पॅकेजेससाठी मागवलेल्या निविदांमधून १७ पात्र निविदांपैकी १३ कंत्राटदारांना कामे मंजूर केली. या १३ कंपन्यांमध्ये नागपूर: मेधा अभियांत्रिकी, वर्धा: Afcons, अमरावती: एन.सी.सी, वाशिम (पूर्व): PNC इन्फ्राटेक, वाशिम (पश्चिम): सद्भाव अभियांत्रिकी, बुलढाणा (पूर्व): APCO, बुलढाणा (पश्चिम): रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, जालना: माँटेकार्लो, औरंगाबाद (पूर्व): मेघा अभियांत्रिकी, औरंगाबाद (पश्चिम): एल अँड टी, अहमदनगर: गायत्री प्रकल्प, नाशिक (पूर्व): दिलीप बिल्डकॉन, नाशिक (पश्चिम): BSCPL या कंपन्यांचा समावेश होता.
Read More
१३
जून २०१८
भूसंपादनाचे ८६ टक्के काम पूर्ण
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून, यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून जमीनींचे आधिग्रहण करताना त्यांना तब्बल ५,२८५.९४ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. यामध्ये बुलडाणा (६१३.६७ कोटी), औरंगाबाद (११९०.०८ कोटी), वाशिम (३९७.३२ कोटी), नाशिक ८७६.२६ कोटी), अमरावती (२८५.६९ कोटी), वर्धा ३७०.०० कोटी), ठाणे ५९७.८३ कोटी), जालना ३७३.०१ कोटी), अहमदनगर (२८३.४३ कोटी) आणि नागपूर (२९३.६५ कोटी) या जिल्ह्यांचा समावेश आहे.
Read More
१
ऑक्टोबर २०१८
समृद्धी महामार्गाच्या सुधारित किमतीला मान्यता
१४ जून २०१८ रोजी समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाला ४९,२४७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. पण निविदा प्रक्रियेनंतर प्रकल्पाची सुधारित किंमत ५५,३३५.३२ कोटी रुपये मान्य करण्यात आले. सदर प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या रकमेवरील व्याज ६,३९६.१८ कोटी रुपये वर्षनिहाय अर्थसंकल्पातून उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात आली. हे व्याज ३० महिन्याच्या कालावधीपर्यंत शासनाकडून भरले जाणार असून, त्यास विलंब झाल्यास त्याची पुढील जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर देण्यात आली.
Read More
१८
डिसेंबर २०१८
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शासकीय नियमांमध्ये राहून शेतकरी व संबंधितांना योग्य तो मोबदला देऊन ९० टक्क्यांहून अधिक जमीन संपादित करण्यात आली. समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर १८ डिसेंबर, २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले.
Read More
२०१९
३
जून २०१९
महामार्गाच्या कामातील विलंब टाळण्यासाठी त्रयस्थ समितीची स्थापना
नागपूर – मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी, तसेच कामातील विलंब टाळण्यासाठी व व्याजाच्या रकमेवरील वाढ टाळण्याकरीता सरकारने वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प पाहणी त्रयस्थ समितीची स्थापना केली.
Read More
११
डिसेंबर २०१९
आर्थिक करारांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारणीत सूट
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी विविध संस्थांसोबत करण्यात येणाऱ्या आर्थिक करारांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारणीस सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही सूट नोंदणी अधिनियम १९०८ मधील तरतुदीनुसार देण्यात आली.
Read More
२०
डिसेंबर २०१९
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
उद्धव ठाकरे सरकारने नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे नाव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे २० डिसेंबर २०१९ रोजी जाहीर केले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव द्यायचे यावरून वाद निर्माण झाला होता. या महामार्गाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव दिले.
Read More
२०२१
३१
मे २०२१
९० टक्के भूसंपादन पूर्ण; ५५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण
समृद्धी महामार्गाच्या अहवालानुसार ३१ मे २०२१ पर्यंत ९० टक्के जमीन भूसंपादन करून झाली होती. तर महामार्गावर माती थर टाकणे, तळाचे थरकाम पूर्ण करणे याचे काम ५५ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले होते. महामार्गाच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या एकूण १६९९ बांधकामांपैकी १२८६ साईटचे बांधकाम पूर्ण झाले होते. तर २५३ ठिकाणांवरचे बांधकाम सुरू होते.
Read More
२०२२
११
मे २०२२
महामार्गालगत सोयीसुविधा केंद्रांची निर्मिती
नागपूर – मुंबई महामार्ग हा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बांधण्यात येत असल्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जसे की, पेट्रोल पंप, डिझेल पंप, सीएनजी गॅस स्टेशन, इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन, अग्निशमन केंद्र एटीएम आदी सुविधांसाठी जमीनींचे अधिग्रहण, त्यासाठी लागणारी एकूण जागा, त्याचा मोबदला आदी अटी व नियमांना मान्यता देण्यात आली.
Read More
४
ऑक्टोबर २०२२
समृद्धी महामार्गासाठी वेगमर्यादा निश्चित
मुंबई – नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर धावण्यात येणाऱ्या गाड्यांची वेगमर्यादा घाटामध्ये किमान ८० किलोमीटर आणि समतल भागात कमाल १२० किलोमीटर प्रति तास निश्चित करण्यात आली. तसेच या महामार्गावर दुचाकी, तीन चाकी रिक्षा, चार चाकी रिक्षा यांना वाहतुकीस बंदी घातली आहे.
Read More
११
डिसेंबर २०२२
नागपूर ते शिर्डी टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गातील ७०१ किलोमीटरपैकी नागपूर-शिर्डी (Samruddhi Mahamarg Nagpur to Shirdi) ५२० किलोमीटर या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी उद्घाटन करण्यात आले.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या ५२० किमीच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर नाशिकमधील भरवीरपर्यंतच्या ८० किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Infra Man Devendra Fadnavis) यांनी २६ मे २०२३ रोजी उद्घाटन केले.
समृद्धी महामार्गावरील भरवीर ते इगतपुरी ही २५ किलोमीटरचा तिसरा टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. त्यामुळे एकूण ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गापैकी ६२५ किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू झाला आहे. यापूर्वी दोन टप्प्यात ६०० किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू झाला होता. भरवीर ते इगतपुरी या मार्गामुळे घोटी-सिन्नर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा दीड तास वाचणार आहे. त्याचबरोबर भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडी सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील २४.८७२ किलोमीटर लांबीचा हा मार्ग १६ गावांतून जातो. या तिसऱ्या टप्प्यातील मार्गासाठी १ हजार ७८ कोटी रुपयांचा खर्च आला.
समृद्धी महामार्ग – इगतपुरी ते आमणे अंतिम टप्प्याचे लोकार्पण
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी (नाशिक) ते आमणे (ठाणे) या ७६ किमी मार्गाचे लोकार्पण गुरूवारी (दि. ५ जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. इगतपुरी ते आमण हा ७६ किलोमीटरचा महामार्ग आजपासून प्रवाशांसाठी खुला झाला. त्यामुळे नागपूर ते मुंबई हा १६ तासांचा प्रवास आता फक्त ८ तासांत पूर्ण करता येणार आहे. एमएसआरडीसीने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला होता. या महामार्गासाठी एकूण ५५,३३५.३२ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ७०१ किमी पैकी ५२० किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर २६ मे २०२३ रोजी शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या मार्गाचे, तर ४ मार्च २०२४ मध्ये भरवीर ते इगतपुरी या २५ किमी मार्गाचे आणि आता शेवटच्या ७६ किमीच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. २५ वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेले मुंबई – नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे चे स्वप्नं आजच्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पणाने पूर्ण झाले.
नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे ची घोषणा
देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर वर्षभराच्या आत ३१ जुलै २०१५ रोजी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सर्वप्रथम नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे प्रमाणेच नागपूर-मुंबई असा एक महामार्ग व्हावा, अशी कल्पना देवेंद्रजींच्या मनात २० वर्षांपासून होती. ती त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१५ मध्ये प्रथमच अधिकृतरीत्या विधानसभेत घोषित केली.
मुंबई-नागपूर एक्सप्रेस-वे साठी एमएसआरडीसीची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून निवड
मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या ३० नोव्हेंबर २०१५ च्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस- वे च्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून घोषणा करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम एमएसआरडीसीच्या देखरेखीखाली होणार आहे.
२०१६
५
जुलै २०१६
पूलिंग मॉडेल अंतर्गत जमीन संपादन
नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गाची निर्मिती आणि त्याच्याशी संबंधित कामासाठी लॅण्ड पुलिंग योजनेद्वारे जमीन मिळवणे, तसेच विकसित जमिनीच्या स्वरूपात मोबदला देणे आदी बाबींना मान्यता देण्यात आली. यापूर्वी शासकीय प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया अवलंबवली जात होती. या प्रक्रियेत सरकार जमिनीचा एकरकमी मोबदला देऊन प्रक्रिया पूर्ण करत होती. पण यामुळे काही वेळेस शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रथमच समृद्ध महामार्गासाठी भूसंपादनऐवजी भूसंचयन (लॅण्ड पुलिंग) ही नवी पद्धत वापरली गेली.
नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे बांधणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ जुलै २०१५ रोजी विधानसभेत नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस – वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. या प्रकल्पांतर्गत ११ जिल्हे आणि जवळपास २० महत्त्वाची शहरे द्रुतगती मार्गाने राज्याच्या राजधानीशी जोडली जाणार आहेत. यामुळे या महामार्गाच्या आसपास शैक्षणिक, पर्यटन आणि वैद्यकीय सेवा सुंकुले तयार करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे बांधण्याचा निर्णय घेतला.
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी सरकारने जमीन संपादित करण्यासाठी मोजणीचे काम सुरू केल्यानंतर विदर्भ, औरंगाबाद, नाशिक येथील शेतकऱ्यांनी विरोध केला. सहमतीशिवाय जमीनीची मोजणी होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी विरोधात निदर्शने केली. यावर मुख्यमंत्री, मंत्री आणि स्थानिक आमदारांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यावर मार्ग काढण्यात आला.
१५
जुलै २०१७
रेडी रेकनर रेटचा वापर करून जमिनीचे दर ठरवले
समृद्धी महामार्गासाठी जमीन एकत्रीकरण, भूसंपादन आणि थेट खरेदी योजनेच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया राबवली. यासाठी रेडी रेकनर रेटचा वापर करून जमीनीचे दर ठरवण्यात आले. जमीनीच्या दरात झाडे, घरे, विहिरी आणि शेतातील इतर मालमत्तांचाही समावेश करण्यात आला. काही ठिकाणी जमीन मालकाला रेडी रेकनर रेटप्रमाणे ठरविलेल्या किमतीच्या दुप्पट किंवा १०० टक्के नुकसान भरपाई देऊन तर काही ठिकाणी जागेच्या मूळ किमतीच्या ५ पट अधिक रक्कम देण्यात आली. यामध्ये सरकार शेतकऱ्याची जेवढी जमीन घेणार आहे. त्या जमिनीच्या पाचपट विकसित जमीन (एन.ए. जमीन) त्याच परिसरात मालकी हक्काने दिली गेली.
२०१८
२६
एप्रिल २०१८
भूसंपादन कायद्यामध्ये दुरुस्ती
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीनींचे अधिग्रहण करण्यासाठी सरकारच्यावतीने २६ एप्रिल, २०१८ रोजी भूसंपादन कायदा २०१३ मध्ये दुरुस्ती करून, जमीन अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
३१
मे २०१८
समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कंत्राटदारांची निवड
नागपूर-मुंबई महामार्गाच्या उभारणीसाठी सरकारने १६ पॅकेजेस तयार केली होती. त्यातील १३ पॅकेजेससाठी मागवलेल्या निविदांमधून १७ पात्र निविदांपैकी १३ कंत्राटदारांना कामे मंजूर केली. या १३ कंपन्यांमध्ये नागपूर: मेधा अभियांत्रिकी, वर्धा: Afcons, अमरावती: एन.सी.सी, वाशिम (पूर्व): PNC इन्फ्राटेक, वाशिम (पश्चिम): सद्भाव अभियांत्रिकी, बुलढाणा (पूर्व): APCO, बुलढाणा (पश्चिम): रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, जालना: माँटेकार्लो, औरंगाबाद (पूर्व): मेघा अभियांत्रिकी, औरंगाबाद (पश्चिम): एल अँड टी, अहमदनगर: गायत्री प्रकल्प, नाशिक (पूर्व): दिलीप बिल्डकॉन, नाशिक (पश्चिम): BSCPL या कंपन्यांचा समावेश होता.
१३
जून २०१८
भूसंपादनाचे ८६ टक्के काम पूर्ण
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून, यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून जमीनींचे आधिग्रहण करताना त्यांना तब्बल ५,२८५.९४ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. यामध्ये बुलडाणा (६१३.६७ कोटी), औरंगाबाद (११९०.०८ कोटी), वाशिम (३९७.३२ कोटी), नाशिक ८७६.२६ कोटी), अमरावती (२८५.६९ कोटी), वर्धा ३७०.०० कोटी), ठाणे ५९७.८३ कोटी), जालना ३७३.०१ कोटी), अहमदनगर (२८३.४३ कोटी) आणि नागपूर (२९३.६५ कोटी) या जिल्ह्यांचा समावेश आहे.
१
ऑक्टोबर २०१८
समृद्धी महामार्गाच्या सुधारित किमतीला मान्यता
१४ जून २०१८ रोजी समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाला ४९,२४७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. पण निविदा प्रक्रियेनंतर प्रकल्पाची सुधारित किंमत ५५,३३५.३२ कोटी रुपये मान्य करण्यात आले. सदर प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या रकमेवरील व्याज ६,३९६.१८ कोटी रुपये वर्षनिहाय अर्थसंकल्पातून उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात आली. हे व्याज ३० महिन्याच्या कालावधीपर्यंत शासनाकडून भरले जाणार असून, त्यास विलंब झाल्यास त्याची पुढील जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर देण्यात आली.
१८
डिसेंबर २०१८
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शासकीय नियमांमध्ये राहून शेतकरी व संबंधितांना योग्य तो मोबदला देऊन ९० टक्क्यांहून अधिक जमीन संपादित करण्यात आली. समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर १८ डिसेंबर, २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले.
२०१९
३
जून २०१९
महामार्गाच्या कामातील विलंब टाळण्यासाठी त्रयस्थ समितीची स्थापना
नागपूर – मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी, तसेच कामातील विलंब टाळण्यासाठी व व्याजाच्या रकमेवरील वाढ टाळण्याकरीता सरकारने वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प पाहणी त्रयस्थ समितीची स्थापना केली.
११
डिसेंबर २०१९
आर्थिक करारांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारणीत सूट
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी विविध संस्थांसोबत करण्यात येणाऱ्या आर्थिक करारांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारणीस सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही सूट नोंदणी अधिनियम १९०८ मधील तरतुदीनुसार देण्यात आली.
२०
डिसेंबर २०१९
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
उद्धव ठाकरे सरकारने नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे नाव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे २० डिसेंबर २०१९ रोजी जाहीर केले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव द्यायचे यावरून वाद निर्माण झाला होता. या महामार्गाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव दिले.
२०२१
३१
मे २०२१
९० टक्के भूसंपादन पूर्ण; ५५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण
समृद्धी महामार्गाच्या अहवालानुसार ३१ मे २०२१ पर्यंत ९० टक्के जमीन भूसंपादन करून झाली होती. तर महामार्गावर माती थर टाकणे, तळाचे थरकाम पूर्ण करणे याचे काम ५५ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले होते. महामार्गाच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या एकूण १६९९ बांधकामांपैकी १२८६ साईटचे बांधकाम पूर्ण झाले होते. तर २५३ ठिकाणांवरचे बांधकाम सुरू होते.
२०२२
११
मे २०२२
महामार्गालगत सोयीसुविधा केंद्रांची निर्मिती
नागपूर – मुंबई महामार्ग हा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बांधण्यात येत असल्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जसे की, पेट्रोल पंप, डिझेल पंप, सीएनजी गॅस स्टेशन, इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन, अग्निशमन केंद्र एटीएम आदी सुविधांसाठी जमीनींचे अधिग्रहण, त्यासाठी लागणारी एकूण जागा, त्याचा मोबदला आदी अटी व नियमांना मान्यता देण्यात आली.
४
ऑक्टोबर २०२२
समृद्धी महामार्गासाठी वेगमर्यादा निश्चित
मुंबई – नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर धावण्यात येणाऱ्या गाड्यांची वेगमर्यादा घाटामध्ये किमान ८० किलोमीटर आणि समतल भागात कमाल १२० किलोमीटर प्रति तास निश्चित करण्यात आली. तसेच या महामार्गावर दुचाकी, तीन चाकी रिक्षा, चार चाकी रिक्षा यांना वाहतुकीस बंदी घातली आहे.
११
डिसेंबर २०२२
नागपूर ते शिर्डी टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गातील ७०१ किलोमीटरपैकी नागपूर-शिर्डी (Samruddhi Mahamarg Nagpur to Shirdi) ५२० किलोमीटर या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी उद्घाटन करण्यात आले.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या ५२० किमीच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर नाशिकमधील भरवीरपर्यंतच्या ८० किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Infra Man Devendra Fadnavis) यांनी २६ मे २०२३ रोजी उद्घाटन केले.
समृद्धी महामार्गावरील भरवीर ते इगतपुरी ही २५ किलोमीटरचा तिसरा टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. त्यामुळे एकूण ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गापैकी ६२५ किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू झाला आहे. यापूर्वी दोन टप्प्यात ६०० किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू झाला होता. भरवीर ते इगतपुरी या मार्गामुळे घोटी-सिन्नर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा दीड तास वाचणार आहे. त्याचबरोबर भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडी सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील २४.८७२ किलोमीटर लांबीचा हा मार्ग १६ गावांतून जातो. या तिसऱ्या टप्प्यातील मार्गासाठी १ हजार ७८ कोटी रुपयांचा खर्च आला.
समृद्धी महामार्ग – इगतपुरी ते आमणे अंतिम टप्प्याचे लोकार्पण
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी (नाशिक) ते आमणे (ठाणे) या ७६ किमी मार्गाचे लोकार्पण गुरूवारी (दि. ५ जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. इगतपुरी ते आमण हा ७६ किलोमीटरचा महामार्ग आजपासून प्रवाशांसाठी खुला झाला. त्यामुळे नागपूर ते मुंबई हा १६ तासांचा प्रवास आता फक्त ८ तासांत पूर्ण करता येणार आहे. एमएसआरडीसीने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला होता. या महामार्गासाठी एकूण ५५,३३५.३२ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ७०१ किमी पैकी ५२० किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर २६ मे २०२३ रोजी शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या मार्गाचे, तर ४ मार्च २०२४ मध्ये भरवीर ते इगतपुरी या २५ किमी मार्गाचे आणि आता शेवटच्या ७६ किमीच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. २५ वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेले मुंबई – नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे चे स्वप्नं आजच्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पणाने पूर्ण झाले.
औद्योगिक विकास व स्थानिक प्रगतीचा 'समृद्ध' महामार्ग
समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील अंतर ८ ते ९ तासांवर येत आहे. या महामार्गामुळे राज्याताली मागास भागाच विकास होण्यास मदत होणार असून, यातून रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच औद्योगिक विकासाला गती देखील मिळणार आहे. समृद्धी कॉरिडॉरच्या माध्यमातून या महामार्गाच्या आसपास औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क आणि स्मार्ट नगरे उभारली जाणार आहेत. यामुळे स्थानिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.