मानवगाथा | गडचिरोली

महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस: नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलवणारे नेतृत्व!

देवेंद्र फडणवीस हे फक्त राजकारणी नाहीत; तर एक संवेदनशील, दूरदृष्टी असलेले आणि लोकांच्या समस्यांना आपलेसे मानून त्यावर उपाययोजना शोधणारे नेतृत्व आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागाचे पालकमंत्रीपद त्यांनी स्वत:कडे ठेवले. जो जिल्हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. त्याची महाराष्ट्रातील पहिला जिल्हा अशी ओळख निर्माण करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश येत आहे. यावरून त्यांची राजकारण आणि समाजकारणावरील भूमिका स्पष्ट होते. नुकतेच त्यांनी गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या १३ नक्षल युवक-युवतींच्या सामुदायिक विवाहसोहळ्याला हजेरी लावून एक वेगळाच संदेश या भागातील लोकांना दिला.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची खरी ताकद ही, ‘समस्या पाहण्याची दृष्टी’ आणि ‘माणूस म्हणून माणसाशी जोडणारी संवेदना’, आहे. प्रशासनाचे प्रमुख म्हणून ते फक्त कायदे आणि योजना जाहीर करणारे नेते नाहीत. तर त्या अंमलात आणण्यासाठी स्वतःहून पुढे येणारे आणि प्रत्येक निर्णयामागे माणूसपण जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. यापूर्वी त्यांनी सामाजिक पुनर्वसनाच्या दृष्टीने आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी वसाहत उभारण्याचा निर्णय घेतला आणि आता या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक विवाहसोहळ्याचे आयोजन केले गेले. या सोहळ्याला स्वतः उपस्थित राहून ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’, अशा आश्वासक शुभेच्छा या नवदाम्पत्यांना दिल्या. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षली तरुण-तरुणींना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांच्या मानसिक तयारीबरोबरच त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यावरही त्यांनी भर दिला. यातून नक्षलवादाची चळवळ समूळ नष्ट करण्यासाठी फक्त बंदुकीचा वापर न करता नक्षलींच्या मनात उतरून त्यांचे हृदयपरिवर्तन करून त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला जात आहे.

मुख्यमंत्री अन् महाराष्ट्र सेवकही…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत. राज्यातील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी त्यांची आहे. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांना सर्वांगिण विचार करून एकमताने निर्णय घ्यावे लागतात. लोकहितासाठी काहीवेळेस कठोर निर्णयही घ्यावे लागतात. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी गडचिरोली आणि आजुबाजूच्या राज्याला लागून असलेल्या सिमेवरील नक्षली कारवाया मोडून काढण्यासाठी पोलीस चौक्यांची स्थापना केली. वेळप्रसंगी नक्षली कारवायांमध्ये सहभागी असलेल्यां विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्णय घेतले. मात्र त्याचवेळी गडचिरोलीचे पालकमंत्री आणि एक महाराष्ट्र सेवक म्हणून तिथल्या लोकांना सुरक्षितता पुरवण्याबरोबरच, रोजगार उपलब्ध करून देण्यावर ही त्यांनी भर दिला आहे. उद्योजकांंना गडचिरोलीमध्ये निमंत्रित करून तिथे प्लांट उभारण्यावर भर दिला जात आहे. यापूर्वी २०१४ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री असतना, त्यानंतर मागील अडीचवर्षापासून ते आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी जी काही पाऊले उचलली. त्यातून त्यांची तिथल्या लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि सहवेदना स्पष्ट दिसून येते.

गडचिरोलीचा विकास आणि नक्षलवादाचा समूळ नाश

गडचिरोली जिल्ह्याचा विकास आणि तेथील नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने त्यांनी घेतलेले निर्णय हे प्रशंसनीय आहेत. नक्षली समस्येच्या मुळाशी जाऊन, स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमांवरील सुरक्षेचा आढावा घेऊन तिथला बॅकलॉग भरून काढला. तिथला सुरक्षा यंत्रणा बळकट केली. नेलगुंडा, पेनगुंडा आणि कवंडे या सीमेवरील गावांमध्ये अत्यंत कमीवेळेत पोलीस चौक्यांची स्थापना केली. यामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांवर आणि स्थलांतरावर मोठा परिणाम झाला आहे. देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याला सातत्याने भेटी देत आहेत. त्यामुळे तिथल्या पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणांचे मनोबल वाढले आहे. सर्वसामान्य गावकऱ्यांनाही मानसिक आधार मिळू लागला आहे. यातून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे मनोबल वाढू लागले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हसेत ‘धरती आबा’ अभियाना अंतर्गत कवंडे, नेलगुंडा आणि पेनगुंडा येथे आयोजित केलेल्या शिबिरांतून एकूण ५३३ लाभार्थ्यांना आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, अन्न सुरक्षा योजना, पीएम किसान सन्मान निधी, मनरेगा जॉब कार्ड, स्क्रिनिंग व अ‍ॅनिमिया तपासणी, आधार अद्ययावत करणे आणि जात प्रमाणपत्र आदी योजनांचे लाभ प्रदान करण्यात आले.

दीड वर्षात ४४ नक्षलींचे आत्मसमर्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ जून रोजी केलेल्या दौऱ्यात कोट्यवधींचे इनाम असलेल्या १२ नक्षलींनी आपल्याकडील अत्याधुनिक शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. तसेच छत्तीसगड सीमेवर उभारण्यात आलेल्या आऊटपोस्ट (पोलीस चौक्या) अवघ्या २४ तासांत उभारण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षात या भागात ६ नवीन आऊटपोस्ट उभारण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी इथे उभ्या केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे गेल्या दीड वर्षात २८ नक्षली ठार झाले, तर ३१ जणांना अटक करण्यात आली आणि ४४ नक्षलींनी आत्मसमर्पण केले. ही धडाकेबाज कारवाई करणाऱ्या जवानांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. त्यांना एके-१०३, रायफल्स, एएसएम-आय पिस्तुलं आणि बुलेटप्रूफ जॅकेट्स, बुलेटप्रूफ चारचाकी वाहने दिली.

गडचिरोलीतील बदलती स्थिती, वाढलेली सुरक्षा, आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना पुन्हा सहभागी करून घेण्यासाठी राज्य सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांमुळे गडचिरोली बदलत आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *